+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule24 Jul 20 person by visibility 1617 categoryउद्योग
माजी सैनिकांना  प्रशासक नेमा: लक्ष्मीकांत हांडे                कोल्हापूर: 
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                              हांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या विकासात सैनिकांचे योगदान अढळ राहिले आहे. ज्या ज्या वेळी देश संकटात सापडला त्या त्या प्रत्येक वेळी देशातील सैनिकांनी जीवाची बाजी लावत परकीय शत्रूंपासून देशाचे रक्षण केले आहे. केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर देशातील आपत्कालीन परिस्थितीतही  सैनिकच नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असतात.
देशासाठी आजपर्यंत हजारो वीरांनी बलिदान दिले आहे. युद्धभूमीवर शत्रूशी लढताना प्राण गेला तरी बेहत्तर पण माझा देश वाचला पाहिजे, यासाठीच आपलं आयुष्य वेचणारे सैनिकच या राष्ट्राचे खरे तारणहार  आहेत. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई व्हावे असे सरकारला मनोमन वाटत असेल तर त्यांनी  प्रत्येक जिल्ह्यात सैनिकांसाठी राखीव जागा ठेवत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची निवड करावी अशी मागणी हांडे यांनी केली आहे.                           
    कारगिल विजयी दिनी घोषणा करा
  देशाच्या इतिहासात 26 जुले हा  कारगिल विजयी दिवस अभिमानास्पद असून सरकारने या दिवशीच माजी सैनिकांची  ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करत कारगिल युद्धात शाहिद झालेल्या शूरवीरांना अनोखी मानवंदना द्यावी, अशी मागणीही हंडे यांनी व्यक्त केली आहे.     
              कोरोना काळातही खांद्याला खांदा
   कोरोना काळात ज्यांनी काम करणे आवश्यक होते अशा अनेक संबंधित घटकांनी आपली जबाबदारी झटकत यातून पळ काढला; मात्र राज्यातील माजी सैनिकांनी जबाबदारीची जाणीव ओळखून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कोरोना संसर्गाची भीती असतानाही हे रणभूमीवरचे योद्धे कोरोनाविरुद्ध लढताना मागे हटले नाहीत.त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी लक्ष्मीकांत हंडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे