+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule23 Jun 21 person by visibility 4903 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)

पर्यावरणाचे संरक्षण करावे म्हणून निसर्गप्रेमी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. निसर्ग वाचवत असताना निसर्गावर कुराड मारणाऱ्यावर कारवाई करावी, वृक्षतोड थांबावी असा उद्देश बाळगून पर्यावरणवादी प्रयत्न करत असतात मात्र गेली महिनाभर वृक्षतोड करणार्‍यावर कारवाई करावी म्हणून पाटलाग करूनही कारवाई झालेली नाही; त्यामुळे वृक्षतोड करणारे जोमात संरक्षण करणारा मात्र कोमात अशी काहीशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे.


मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते. तळेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास ठेकेदारास परवानगी दिली होती. संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी अंदाजे 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत. हे पर्यावरणाची खूप मोठे नुकसान मुद्दाम हून केले आह.

वृक्षतोड करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासाठी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई,परिक्षेत्र वनअधिकारी राधानगरी एस. बी. बिराजदार, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. 


माजगावकर या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी यासाठी गेले एक महिनाभर पाठपुरावा करत आहेत. 

सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग किंवा वन अधिकारी दोषींवर इतके मेहरबान का? दोषींवर अजून साधा गुन्हा नोंद नाही. ते गुन्हा नोंद करतात की नाही हे पाहण्याची गरज वाटू लागली आहे.आता जिल्हाधिकारी देसाई यांनी या विभागाकडून अहवाल मागवून दोषींवर कारवाई करावी अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.