Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादनजागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त विशेष: पत्की हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन!करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी

जाहिरात

 

सोनार्ली गावचा चाळीस वर्षांचा वनवास संपला; अमल महाडिकांच्या पाठपुराव्याने स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर*

schedule12 Mar 24 person by visibility 397 categoryराजकीय

कोल्हापूर ; आवाज इंडिया

        कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा धरण प्रकल्पातील विस्थापित झालेले सोनार्ली धरणग्रस्त हे गाव सन 1985 साली पेठ वडगाव शेजारी वसवण्यात आले आहे. सोनार्ली हे गाव विस्थापित होऊन जवळ - जवळ 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या विस्थापित गावाला आजही सर्व प्रकारच्या प्रशासकीय मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत होते कारण या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय नव्हते. 

      या गावातील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मूलभूत हक्कासाठी शासन दरबारी त्यांनी आपला लढा सुरु केला. गावच्या सेवा सुविधा व ग्रामपंचायत कार्यालयासाठी शासन दरबारी मोर्चे, अंदोलनाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत होते. 

          ग्रामस्थांच्या या लढ्याला माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनीही पाठबळ दिले. 2021-22 साली सोनार्ली गावची स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी बाबतचा प्रस्ताव शसन दरबारी दाखल झाला. शासनाच्या विविध विभागातून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत माजी आमदार अमल महाडिक यांनी हा लढा यशस्वी केला.

        दि. 7.03.2024 रोजीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात सोनार्ली ग्रामपंचायत मंजुरीची अंतिम अधिसूचना प्रसारित झाली आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयाचा हा लढा यशस्वी करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विलास सोनावणे, कौशिक आनंद,संतोष गोटल, बाळू पाटील,अकबर पन्हाळकर (सर),पांडुरंग लाखन,काशिनाथ घोलप,सुलेमान पन्हाळकर, पिरमहमद पन्हाळकर,किरण कांबळे,अंकुश घोलप,पांडुरंग कोठारी, ॲड. दिनेश घोलप,चंद्रकांत य. घोलप, उस्मान पन्हाळकर, काळू सकपाळ यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes