Awaj India
Register
Breaking : bolt
धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिकाकोल्हापूर महानगरपालिका प्रभाग 20 मध्ये किशोरी कोळेकर चर्चेतआदर्श व गुणवंत शिक्षक हिरामणी कांबळे सरांची उल्लेखनीय कामगिरीश्रीरामकृष्ण विद्यामंदिर’चे लोकप्रिय शिक्षक जनार्दन कांबळे यांना विद्यार्थ्यांची ओढकर्तृत्ववान मुख्याध्यापक श्रीकांत गावकर : मराठी शाळांचे ‘तारणहार’सचिन परीट सरांचे समाजप्रबोधनात मोलाचे योगदानअरविंद कांबळे सर—शिक्षणपेशीला शोभेल असं बहुआयामी व्यक्तिमत्व

जाहिरात

 

भारतीयांचा असंतोष ब्रिटिशांच्या पर्यंत पोचवून स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग लोकमान्य टिळकांनी फुंकले - प्राचार्य बी. एस. पाटील

schedule12 Aug 23 person by visibility 169 categoryराजकीय


अन्यायी ब्रिटिश राजवटी पासून भारताची मुक्तता करण्यासाठी भारतीयांचा असंतोष ब्रिटिशांच्या पर्यंत झाल मतवादी विचारसरणीने पोहोचवून स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी फुंकले असे मत प्राचार्य बी एस पाटील यांनी व्यक्त केले इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा शांताराम कांबळे होते.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य बी एस पाटील म्हणाले की, ब्रिटिशांची राजवट ही अन्याय राजवट म्हणून जगद्विख्यात असताना सुद्धा भारतातील लोकांचे संघटन उभारून त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांचे संघटन टिळकांनी उभे केले. 
यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना प्रा शांताराम कांबळे म्हणाले की, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना ओळखले जाते ती त्यांनी लिहिलेल्या वर्तमानपत्रातील अग्रलेखांमुळे. त्यांचे अग्रलेख हा स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहिले पाहिजे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes