+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule12 Aug 23 person by visibility 127 categoryराजकीय

अन्यायी ब्रिटिश राजवटी पासून भारताची मुक्तता करण्यासाठी भारतीयांचा असंतोष ब्रिटिशांच्या पर्यंत झाल मतवादी विचारसरणीने पोहोचवून स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी फुंकले असे मत प्राचार्य बी एस पाटील यांनी व्यक्त केले इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा शांताराम कांबळे होते.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य बी एस पाटील म्हणाले की, ब्रिटिशांची राजवट ही अन्याय राजवट म्हणून जगद्विख्यात असताना सुद्धा भारतातील लोकांचे संघटन उभारून त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांचे संघटन टिळकांनी उभे केले. 
यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना प्रा शांताराम कांबळे म्हणाले की, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना ओळखले जाते ती त्यांनी लिहिलेल्या वर्तमानपत्रातील अग्रलेखांमुळे. त्यांचे अग्रलेख हा स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहिले पाहिजे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते