+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule24 Jul 24 person by visibility 132 category
  
 कोल्हापूर ;
 जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे पावसाच्या दरम्यान परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून परीक्षा पुन्हा घेतल्या जातील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
मार्च/एप्रिल, २०२४ सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागातील रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अडचणी उद्भवू शकतात.

सबब, दि. २५/०७/२०२४ ते दि. २७/०७/२०२४ रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत याची नोंद घ्यावी. तसेच स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
वरील विषयास अनुसरून आपणांस माहिती असेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिमुसळदार पाऊस पडत आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. आजूबाजूच्या गावांचा एकमेकांशी असणारा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची वाहतूक सुद्धा बंद आणि ठप्प झालेली आहे. त्यातच पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे. साधारण ४२ फुटापर्यंत वाहत आहे. ४३ फूट ही धोक्याची पातळी असल्याने ती गाठण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

आणि त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत विधी व अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा येल्या 25 जुलै ते 27 जुलै पर्यंत व पुढे आहेत.
 भारती विद्यार्थीी मोर्चाचे किरण कांबळे यांनी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे कांबळे यांनी सांगितले.