कोल्हापूर ;
जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे पावसाच्या दरम्यान परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला यश आले असून परीक्षा पुन्हा घेतल्या जातील अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
मार्च/एप्रिल, २०२४ सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागातील रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी अडचणी उद्भवू शकतात.
सबब, दि. २५/०७/२०२४ ते दि. २७/०७/२०२४ रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत याची नोंद घ्यावी. तसेच स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
वरील विषयास अनुसरून आपणांस माहिती असेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिमुसळदार पाऊस पडत आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. आजूबाजूच्या गावांचा एकमेकांशी असणारा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची वाहतूक सुद्धा बंद आणि ठप्प झालेली आहे. त्यातच पंचगंगा नदी ही इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे. साधारण ४२ फुटापर्यंत वाहत आहे. ४३ फूट ही धोक्याची पातळी असल्याने ती गाठण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
आणि त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत विधी व अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा येल्या 25 जुलै ते 27 जुलै पर्यंत व पुढे आहेत.
भारती विद्यार्थीी मोर्चाचे किरण कांबळे यांनी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला असल्याचे कांबळे यांनी सांगितले.