Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

जाहिरात

 

अभ्यास केल्यास निश्चित यश : प्रा.डाॕ.गुंडूराव कांबळे

schedule08 Aug 23 person by visibility 332 categoryशैक्षणिक


चंदगड (आवाज इंडिया)
  ध्येय निश्चित करुन,प्रचंड जिद्द बाळगून सातत्याने अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते.यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयातील मराठीचे प्रा.डाॕ.गुंडूराव कांबळे यांनी केले .
 ते शिवणगे येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते .अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे अधीक्षक नवनीत पाटील होते .
प्रा.डाॕ.कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,माजी आमदार कै.नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या सत्यशोधकीय व पुरोगामी विचारांचा आदर्श वैचारिक वारसा या शिवणगे गावाला आहे .या.वस्तीगृहात राहून अनेक विद्यार्थ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपर्यात आपल्या कामाचा यशस्वी ठसा नोंदवला आहे . वेळ अजिबात वाया न घालवता विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचण्यासाठी धडपडले पाहिजे .वैविध्यपूर्ण वाचणावर व आपल्या अभ्यासावरच आपले लक्ष केंद्रीत करायला हवे.सातत्याने चौफेर वाचनानेच आपले व्यक्तीमत्व प्रगल्भ बनते.चंदगड तालुका ही गुणवंताची खाण असून तालुक्यातीला अनेकांनी विविध क्षेत्रात उतुंग यश मिळवून, नावलौकिक मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे .तोच आदर्श कायम ठेवून आपल्या परिस्थितीला दोष न देता प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असेही त्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले .
 अध्यक्षीय भाषणात नवनीत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करुन यशाची गरुडझेप घ्यावी असे आवाहन केले .
 प्रास्तविक रमेश कांबळे यांनी केले .सूत्रसंचालन विवेक लहू गावडे यांनी केले .तर आभार विठ्ठल जाणकर यांनी मानले.यावेळी वस्तीगृहातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes