Awaj India
Register
Breaking : bolt
​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (KMRDA) १ जून रोजी दसरा चौकात लाक्षणिक उपोषणश्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

 

अभ्यास केल्यास निश्चित यश : प्रा.डाॕ.गुंडूराव कांबळे

schedule08 Aug 23 person by visibility 371 categoryशैक्षणिक


चंदगड (आवाज इंडिया)
  ध्येय निश्चित करुन,प्रचंड जिद्द बाळगून सातत्याने अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते.यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयातील मराठीचे प्रा.डाॕ.गुंडूराव कांबळे यांनी केले .
 ते शिवणगे येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते .अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे अधीक्षक नवनीत पाटील होते .
प्रा.डाॕ.कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,माजी आमदार कै.नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या सत्यशोधकीय व पुरोगामी विचारांचा आदर्श वैचारिक वारसा या शिवणगे गावाला आहे .या.वस्तीगृहात राहून अनेक विद्यार्थ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपर्यात आपल्या कामाचा यशस्वी ठसा नोंदवला आहे . वेळ अजिबात वाया न घालवता विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचण्यासाठी धडपडले पाहिजे .वैविध्यपूर्ण वाचणावर व आपल्या अभ्यासावरच आपले लक्ष केंद्रीत करायला हवे.सातत्याने चौफेर वाचनानेच आपले व्यक्तीमत्व प्रगल्भ बनते.चंदगड तालुका ही गुणवंताची खाण असून तालुक्यातीला अनेकांनी विविध क्षेत्रात उतुंग यश मिळवून, नावलौकिक मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे .तोच आदर्श कायम ठेवून आपल्या परिस्थितीला दोष न देता प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असेही त्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले .
 अध्यक्षीय भाषणात नवनीत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करुन यशाची गरुडझेप घ्यावी असे आवाहन केले .
 प्रास्तविक रमेश कांबळे यांनी केले .सूत्रसंचालन विवेक लहू गावडे यांनी केले .तर आभार विठ्ठल जाणकर यांनी मानले.यावेळी वस्तीगृहातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes