Awaj India
Register
Breaking : bolt
इंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणीयुनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून* *डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट*हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणारNEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणारग्रामीण विकासासाठी अध्यक्षा शिल्पा खोत यांचा धडाकेबाज तालुका दौरा; गडहिंग्लजमध्ये नागरिकांच्या समस्यांवर प्रशासन तत्परकोल्हापूरच्या पाच तालुक्यांत आता फुलणार ‘पांढरे सोने’; ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी १० मे पासून अर्ज प्रक्रिया सुरूविनाअनुदानित शाळांना कोल्हापूर खंडपीठाचा मोठा दिलासा; जाचक शासन निर्णय रद्द!कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*

जाहिरात

 

वकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणी

schedule16 May 26 person by visibility 32 categoryगुन्हे

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी ॲड. तौसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत केल.
शेख यांनी सांगितले की, १४ एप्रिल २०२६ रोजी वाहन चलनासंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश पाटील आणि रुपेश माने यांनी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मारहाण केली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 
या घटनेमुळे कोल्हापूर बार असोसिएशनसह राज्यभरातील वकिलांनी निषेध व्यक्त केला असून, संबंधित पोलिसांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी वकिलांवर दबाव टाकणे, मारहाण करणे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 
दरम्यान, कोल्हापूर पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे शेख यांनी म्हटले. कायद्याचे रक्षण करणारेच जर दहशतीचे वातावरण निर्माण करत असतील, तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes