Awaj India
Register
Breaking : bolt
शिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकस्मार्ट सर्व्हिसेस'ने ऊसतोड कामगारांची नोंदणी अचानक थांबवली; महाराष्ट्र ऊस तोडणी संघटनेचा मुंबई मोर्चाचा इशाराकोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) प्रशासकडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती*अन्यायाला न जुमानणारे बंडखोर नेतृत्व : भावी आमदार सत्यजित उर्फ नाना कदमआठवणींचा ओलावा… शब्दात न मावणारी पोकळीकोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; शरीरास घातक इंजेक्शन आणि गांजासह दोघे ताब्यातइचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघे जेरबंद

जाहिरात

 

वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

schedule12 Jun 25 person by visibility 1434 categoryगुन्हे

कोल्हापुर; (प्रशांत चुयेकर)
वाडीपीर (ता. करवीर ) येथील जलजीवन मिशनची योजना काही दिवस बंद आहे. सातत्याने पाईप लाईन फुटत असल्याने गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. स्वच्छ आणि मुबलक पाण्याच्या नावाखाली या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. वाडीपीर येथील जल जीवन मिशन कोणी खाल्ले जास्त कमिशन असा प्रश्नही ग्रामस्थ विचारत आहेत.
 
ग्रामीण भागातील कुटुंबांना 55 लिटर पाणी देण्यात यावे. असा उद्देश या योजनेचा आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली. २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणी (Functional Household Tap Connection - FHTC) प्रत्येक ग्रामीण घरात देणे असा उद्देशीय योजनेचा होता.
वाडीपीर या गावात 2025 पर्यंत पूर्ण काम केलेली नाही. महिन्यातून चार वेळा ही योजना बंद असते. पाणी आले तर अस्वच्छ आणि गढूळ असते. यामुळे गावातील नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत आहे. काही महिलांनी पाण्यामध्ये अळ्या असल्याचा आरोप केला. 
ज्योती दिलीप दिंडे सांगतात,पिण्याचे पाणी विकत आणावे लागते. पाणी गढूळ असल्यामुळे लोक आजारी पडतात. आजारणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे. गावात शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. काही महिलांनी डेंगूचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले तर पाणी फिल्टर होत नाही असेही सांगितले.
येथील उज्वला बाबासाहेब धोत्रे म्हणाल्या, अस्वच्छ पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले. मुबलक पाणी येत नाही. येथील नागरिक संजय पोवार म्हणाले,ही योजना पूर्णत्वास झाली नसून याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली आहे. दोन महिने याचा पाठपुरावा आम्ही करत आहे. अद्याप आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. विश्वास दिंडे म्हणाले, अशूद्ध पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.फिल्टरचे मशीन बंद असून पाणी फिल्टर केले जात नाही.
 पाडळी (ता. करवीर ) येथून सात किलोमीटरवर असणारे वाडीपीर या ठिकाणी ही जल जीवन मिशन योजना सात किलोमीटर पेक्षा अधिक अंतराने घेतलेले आहे. पाईपलाईनला वळण अधिक असल्याकारणाने पाईपलाईन गळती होत आहे.भविष्यात गळतीचा खर्च ग्रामपंचायतीला परवडणार नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले.
क्रमशः
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes