Awaj India
Register
Breaking : bolt
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता*विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे* डॉ. डी. वाय. पाटील यांनी गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली

जाहिरात

 

भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले नियुक्तीपत्रांचे वाटप*

schedule04 Jan 24 person by visibility 364 categoryराजकीय

दि.२/०१/२०२४

*
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या, जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नूतन पदाधिकार्‍यांनी पक्षाचे शिलेदार म्हणून काम करावे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, त्यातून सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवावेत, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.
फेबु्रवारीच्या दुसर्‍या आठवडयात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यासाठी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सांगड घालत, पक्षाच्या विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची वर्णी लागलीय. अजितसिंह चव्हाण, लक्ष्मण पाटील, रमेश सावंत, बाबासाहेब पाटील, केरबा माने, विजय उपाध्ये, राजगोंडा पाटील, प्रकाश पाटील, नामदेव साळोखे, गणेश माने, रमेश मगदुम, विष्णू काटकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांना विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. या सर्वांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी ४० ते ४५ युवकांनी, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचेही स्वागत खासदार महाडिक यांनी केले. यावेळी खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षातील कामगिरीचा आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे सर्वच क्षेत्रात देशाची वेगवान प्रगती सुरू आहे. मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ कोटयवधी नागरिकांना मिळत असल्याने, २०२४ च्या निवडणुकीत भाजप संपूर्ण बहुमताने निवडून येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भाजपला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे शिलेदार म्हणून काम करावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर, भगवान काटे, शिवाजीराव बुवा, अजितसिंह काटकर, नामदेव पाटील, सुरेश बेनाडे, आनंद गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes