Awaj India
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण

जाहिरात

 

पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकर

schedule02 Feb 25 person by visibility 571 categoryआरोग्य

कोल्हापूर:
शिरोळ प्रदूषणाबाबत इचलकरंजीतील सर्व उद्योजकांची बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन बैठकीत शिरोळ तालुक्यातील 13 गावे नदीच्या प्रदूषणाने चिंताग्रस्त आहेत असा प्रश्न उपस्थित केला यावर अबिटकर यांनी उत्तर दिले.
वीस वर्षापासून पंचगंगा प्रदूषित असल्यामुळे 13 गावांना याचा फटका बसत आहे. प्रसंगी शेती नापीक होत आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. पिण्याला पाणी योग्य मिळत नाही याबाबत पालकमंत्री यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही आपण यात लक्ष घालणार का असे विचारले असता अबिटकर यांनी लवकरच बैठक घेऊन याच्यावर योग्य तोडगा काढू असे उत्तर दिले.
उद्योजकांच्या पेक्षा जनतेला त्याचा कोणताही त्रास झाला नसला पाहिजे याची दक्षता यापुढे घेतली जाईल असेही आबिटकर यांनी सांगितले.
याबाबत राजर्षी शाहू विकास आघाडीचे विश्वास बालीघाटे, जनता दलाचे सरचिटणीस प्रवीणबाई माणगावे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अध्यक्ष संजय आणूसे, जनता दलाचे सरचिटणीस अण्णासो मगदूम,बहुजन विकास आघाडी शिरोळचे तालुका अध्यक्ष रणजीत पाटील यांनी बैठक घेऊन प्रदूषण अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes