Awaj India
Register
Breaking : bolt
के. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमा

जाहिरात

 

आदिल फरास व उजळाईवाडी ग्रामस्थांमध्ये जागेवरून वाद

schedule06 Oct 23 person by visibility 1094 categoryगुन्हे


कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
येथील माजी नगरसेवक आदिल फरास व उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्यामध्ये जागेवरुन वाद निर्माण झाला. हायवे लगतच्या तीन गुंठे जागेवर फरास यांनी कंपाउंड मारलं. हे कंपाउंड मारत असताना ग्रामस्थांनी विरोध केला.
त्यामुळे काही काळ ग्रामस्थ, सरपंच आणि माजी नगरसेवक फरास यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
जे.आर. कॉलनी परिसरातील संबंधित जागा ग्रामपंचायतची आहे असा दावा ग्रामस्थांनी केला.तर ही जागा खरेदी केल्याचा दावा फरास यांनी केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
या घटनेवरून गावात बैठक घेण्यात आली. याबाबत सरपंच उत्तम आंबवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही जागा ग्रामपंचायतीची असल्याचं सांगितलं.याबाबत मोजणी सुद्धा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.माजी नगरसेवक फरास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेही जागा पठाण यांची आहे. त्यांच्याकडून मी एग्रीमेंट केलेले आहे. पठाण कंपाऊंड आपल्या जागेत मारत होते. ग्रामस्थांनी विनाकारण वाद केला.



जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes