Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद

schedule18 Jul 20 person by visibility 3730 categoryलाइफस्टाइल

लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद
: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर-(प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रवासी पास दोन आठवडे बंद ठेवावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना शनिवारी पाठविली आहेत.
राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, कामगार, आदींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून परवाने दिले जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार(दि.२१)पासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रवासी पास देण्यात येऊ नयेत. केवळ तातडीची वैद्यकीय सुविधा, मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना सूट राहील. अशी विनंती या पत्राद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes