Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा उत्साहातडी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवडचळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*पंचगंगा प्रदूषण प्रश्न उद्योजकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवणार : आबिटकरनदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा : माणगावेडॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या* *13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवड*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*शिलेदार हायकर्स फाउंडेशनतर्फे मोफत शालेय बँगचे वाटप

जाहिरात

 

prakashambedkar,mahavikasaghadi,lokasabha:आपली ताकद बघा आणि मग मागा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत

schedule01 Mar 24 person by visibility 104 categoryराजकीय

आपली ताकद बघा आणि मग जागा बघा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत

मुंबई (प्रशांत चुयेकर)
भाजपच्या विरोधात मोठी ताकद उभा करण्यासाठी देशात इंडिया indiaआघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात ही हाच फॉर्मुला घेत महाविकास आघाडीच्यावतीने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पूर्वी इतक्याच लोकसभेच्या जागा मागणं योग्य आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकर prakashambedkar यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना, shivasena राष्ट्रवादी rashtravadi  पक्ष फुटल्यानंतर पक्षाची बरीच हानी झालेली आहे. प्रमुख पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे भाजपला जाऊन मिळाल्याने आता आपल्याजवळ काय आहे. फुटलेल्या पक्षात किती लोक आहेत हे बघूनच जागा वाटप करावे, असे प्रकाश आंबेडकर यांना वाटते.
वंचितने स्वतःच्या बळावर लोकसभा lokasabha आणि विधानसभा vidhansabha निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 41 लाख 32000 पेक्षा अधिकि मतदान त्यांनी घेतलेलं आहे.औरंगाबाद एक अकोला दोन तर 41 लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानी वंचितन मते घेतले आहेत.
विधानसभा निवडणुकीत 24 लाखापेक्षा अधिक मतदान त्यांनी घेतलेला आहे.दहा मतदारसंघात दोन नंबरला त्यांचे उमेदवार आहेत.काही मतदारसंघात तिसऱ्या ठिकाणी उमेदवार आहेत.
स्वतःच्या जीवावर हा प्रयोग त्यांनी पूर्ण केला आहे त्यामुळे साहजिकच आता आपल्याला त्या मतानुसार जागा हव्यात त्यानुसार जागावाटप व्हावे अशी ही मागणी आंबेडकर करत आहेत.
कोणाकडे किती लोक आहेत असं बघूनच लोकसभेच्या जागावाटप करावं असेही प्रकाश आंबेडकर यांना वाटते.दोन वेळच्या निवडणुकीत त्यांनी मताधिक्य अधिक घेतल्या कारणाने त्यांचा दावा करणे हे बरोबर असल्याचेही कार्यकर्त्यांच्या मधून बोलले जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes