Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

दोन मंत्र्यांच सरकार राज्य कसं चालवणार : सतेज पाटील

schedule06 Aug 22 person by visibility 4400 categoryराजकीय

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर 06 ऑगस्ट 2022

लोकशाहीमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळ असणे महत्वाचे आहे.नवीन सरकारमधील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विकासाला मारक आहे,अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडील काही अधिकार हे त्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत.नुकताच हा निर्णय झाला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचेच सरकार सुमारे 35 दिवसांपासून काम करत आहे.यावर बोलताना ते म्हणाले की,शिंदे - फडणवीस सरकारला 40 मंत्री अजून ठरवता येत नाहीत आणि हे सरकार कसे चालवू शकतील ?मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचा फटका विकासकामांना बसत आहे.केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे योग्य आहे का?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान - 

काँग्रेस पक्षातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यासह विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.यावेळी पक्षातर्फे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे,असे सतेज पाटील म्हणाले .


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes