Awaj India
Register
Breaking : bolt
पुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकन

जाहिरात

 

दोन मंत्र्यांच सरकार राज्य कसं चालवणार : सतेज पाटील

schedule06 Aug 22 person by visibility 4628 categoryराजकीय

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर 06 ऑगस्ट 2022

लोकशाहीमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळ असणे महत्वाचे आहे.नवीन सरकारमधील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विकासाला मारक आहे,अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडील काही अधिकार हे त्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत.नुकताच हा निर्णय झाला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचेच सरकार सुमारे 35 दिवसांपासून काम करत आहे.यावर बोलताना ते म्हणाले की,शिंदे - फडणवीस सरकारला 40 मंत्री अजून ठरवता येत नाहीत आणि हे सरकार कसे चालवू शकतील ?मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचा फटका विकासकामांना बसत आहे.केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे योग्य आहे का?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान - 

काँग्रेस पक्षातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यासह विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.यावेळी पक्षातर्फे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे,असे सतेज पाटील म्हणाले .


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes