कोल्हापूर आवाज इंडिया
पाचगाव तालुका करवीर येथे चित्राताई वाघ व शौमीका महाडिक यांच्या आगमनाने गल्ली गल्लीत शिट्टी वाजली.
त्यांच्या आगमनाने मतदारांच्यामध्ये चांगलाच उत्साह वाढला असून पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांनी पाचगावात हवा केली असल्याची चर्चा जोरात झाली.
केंद्रात भाजप राज्यात भाजप पाचगावात सुद्धा भाजप असेल तर विकासाला काहीही कमी पडणार नाही असे आश्वासन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी दिले.
त्या पाचगाव येथे सुवर्णा गाडगीळ व त्यांच्या पॅनलच्या प्रचाराप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी भाजपच्या महिला अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होत्या.
वाघ म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून ते आजतागायत कायमच जनतेचा विकास केला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देण्याचे काम निवळ मोदीच करू शकतात त्यामुळे केंद्रात राज्यात आणि आता पाचगावात भाजप येणे गरजेचे आहे
यावेळी यावेळी महाडिक यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. गटनेते भिकाजी गाडगीळ यांनी माजी आमदार अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून गावाचा विकास झाला असल्याचे सांगितले
यावेळी स्वरा गाडगीळ, तेजस्विनी गाडगीळ, मधुकर मांडवकर,अल्पसंख्यांक मोर्चाचे नजीर देसाई, भाजपचे प्रदेश सदस्य हेमंत बापू पाटील भाजप निरीक्षक मोर्चाचे मधुकर मांडवकर, मेकॅनिक इंजिनियर शिंदे यांची भाषणे झाली.